गेला मोहन कुणीकडे …!!!!
ऑक्टोबर महिना म्हणजे कडक ऊन आणि प्रचंड उकाडा. तोच महिना संपता संपता , पूर्वेचे वारे वाहू लागतात आणि दिवाळीचे वेध लागायला लागतात. लहानपणी दिवाळी म्हणजे आकाशकंदील, फराळ , किल्ला आणि फटाके एवढाच समीकरण होतं. दिवाळीचा फराळ आणि सहमाही परीक्षेचा (mid-sem चा ) काळ असं combination असे . एकीकडे आई बनवत असलेल्या चिवड्याचा खमंग वास आणि दुसरीकडे आकाशकंदील , फटके आणि नवीन ड्रेस (तोही एका वर्षी एकच) खरेदीचे वेध अश्या मनस्थितीत अभ्यास करणे किती अवघड होते. सहामाही परीक्षेत कमी गुण का मिळायचे ते आत्ता कळत आहे. तेंव्हा पण हे कळत होतेच पण कळूनही न वळणे ह्या म्हणीचा पुरेपूर वाक्यात उपयोग करणे हे कोणी न शिकवताच कळले होते. चिवड्याचा खमंग वास , मनात तरंगणारी करंजीची होडी, चकल्यांचे काल्पनिक चक्र , कद्बोळ्याञ्चे आकडे हेच सगळे पुस्तकात दिसत असे, त्यामुळे पेपरात लाडू मिळणे हे नेहमीचेच. हा लाडू नावडीचा, एकदम गोल गोल , आणि लाल रंगाचा . हा लाडू मिळाल्यावर धम्मकलाडू पण आपोआपच मिळत असे. म्हणून मला बुंदीचा , रव्याचा , बेसनाचा, डिंकाचा कुठलाच लाडू कधीच आवडला नाही. :))))
अंदाजे पाचवी , सहावीत गेल्यावर फराळा मधील curiosity अजून वाढू लागली , दिवाळीचा दिवस येई पर्यंत फराळ खायला मिळणार नाही असा rule असल्याने वसुबारस येई पर्यंत फक्त खमंग वासाने पोट भरावे लागे. पण आईला मदत केल्यास फराळ टेस्ट करायला मिळतो हे माझ्यातल्या नटखट Sonia ने जाणले होते. म्हणून फराळ कसा करतात हे बघायला स्वारी स्वय्पाघरात तयार असे. पेपरात लाडू गोल मिळणे किती सोप्पे आणि खरा लाडू गोल वळणे किती अवघड आहे असे वाटू लागले. चकल्या कधी खुसखुशीत तर कधी मऊ कश्या पडतात हे मोठे कोडे अजूनही उमगले नाही आहे किंवा अनारसे हसले म्हणजे काय अश्या वाक्यांचा प्रयोग कळू लागला. कळत न कळत आईचे मुलीला ट्रेनिंग देणे चालू होते. चिवड्याचे पोहे हे अनेक प्रकारचे असतात तेंव्हा कळले. पण त्यातला nylon पोहे हा प्रकार पचतो कसा ह्यावर मला research करायचा होता , तो अजूनही राहूनच गेला आहे. शंकरपाळ्यांना शंकर-पाळे का म्हणतात हे कोडे मला नेहमी पडे. आज २० वर्षांनी ते कोडे सुटले आहे . तो मूळ शब्द हिंदी, त्याला शख्खर-पारे म्हणजे साखरेच्या पोळ्यांचे काप असे म्हणतात. या शख्ख्ररपारे मधे शंकराला कोणी आणला हा मोठ्ठा प्रश्न आहे. पण त्या निमित्ताने शंकराचं नाव मुखी येते हे थोडे थोडके नव्हे. अनारस्याला वरून जो रवा लावतात तो रवा नसून त्याला खसखस म्हणतात. लाडू बनवताना खमंग वास सुटतो तो तुपात रवा किंवा बेसन भाजल्याने असा आईची शिकवणी चालू असे. त्यामुळे खरचच आईला मदत करावी असे वाटू लागले होते. मग लाडू वळायला मदत करणे , शंकरपाळे करणे, कारंजीला आकार देणे , मधूनच चिवडा taste करणे … मग हे आणून दे , ते आणून दे , डब्यात भरून ठेव अशी छोटी छोटी कामे पर्वणी वाटू लागली.
असेच एका वर्षी चकली करणे चालू होते. आई चकलीचे पीठ मळत असल्याने तिने मला आतून मोहन आणावयास सांगितले. मी आत गेले आणि मोहन शोधू लागले. (मोहन म्हणजे गरम केलेले तेल) छोटे डबे झाले , मध्यम डबे , मोठ्ठे डबे झाले मोहन काही सापडेना. असं वाटलं शेजारच्या रानडेंच्या मोहनदादाला आणून उभं करावं !! तेवढ्यात आवाज आला "आता गार झालं असेल पण सावकाश आण". मी विचार सुरु केला गार झालं असणार म्हणजे फ्रीज किव्हा माठापाशी काहीतरी असणार. मी तर confidently आले आहे मोहन आणायला , मग विचारायचे कसे - मोहन म्हणजे काय ?… माझ्यापुढे मोठ्ठा प्रश्न पडला होता … पण तरी स्वारी विचारायला तयार नव्हती … केवढा मोठ्ठा ego होता ह्या चिमुरड्या जीवामध्ये … तो इगो की independent आणि knowledgeable असल्याची जाणीव होती !! हार पत्करणे रक्तातच नाही.
मी फ्रीज मध्ये शोध शोध शोधले , पण मोहन काही सापडेना , काय सापडायचे आहे हेच माहीत नसल्याने झालेली मोठी पंचाईत झाली होती. शेवटचा प्रयत्न म्हणून माठाजवळ शोधणे सुरु केले. मागे पुढे आत बाहेर सगळीकडे पहिले. आता मी तिपाहीच्या खाली बघावे म्हणून माठ उचलला. पाण्याने भरलेला माठ , मला पेलवणार तो कसा!! माझा हात सटकला, माठ फुटला आणि पाणी सांडले , त्यात माझापाय सटकला आणि मी त्या पाण्यात पडले !!…. काही फुटल्याचा आणि धप्पकन पडल्याचा आवाज ऐकून आई ,बाबा , लहान भाऊ , मदतीला आलेल्या शेजारच्या काकू सगळे स्वयापाघरात जमा झाले माझी अवस्था केविलवाण्या कुत्र्याच्या पिल्लासारखी झाली …. अचानक माझं मलाच हसू आलं आणि मी आईला म्हटलं …
पाणीच पाणी चहु कडे गं बाई… गेला मोहन कुणीकडे ?????????? :))))
ऑक्टोबर महिना म्हणजे कडक ऊन आणि प्रचंड उकाडा. तोच महिना संपता संपता , पूर्वेचे वारे वाहू लागतात आणि दिवाळीचे वेध लागायला लागतात. लहानपणी दिवाळी म्हणजे आकाशकंदील, फराळ , किल्ला आणि फटाके एवढाच समीकरण होतं. दिवाळीचा फराळ आणि सहमाही परीक्षेचा (mid-sem चा ) काळ असं combination असे . एकीकडे आई बनवत असलेल्या चिवड्याचा खमंग वास आणि दुसरीकडे आकाशकंदील , फटके आणि नवीन ड्रेस (तोही एका वर्षी एकच) खरेदीचे वेध अश्या मनस्थितीत अभ्यास करणे किती अवघड होते. सहामाही परीक्षेत कमी गुण का मिळायचे ते आत्ता कळत आहे. तेंव्हा पण हे कळत होतेच पण कळूनही न वळणे ह्या म्हणीचा पुरेपूर वाक्यात उपयोग करणे हे कोणी न शिकवताच कळले होते. चिवड्याचा खमंग वास , मनात तरंगणारी करंजीची होडी, चकल्यांचे काल्पनिक चक्र , कद्बोळ्याञ्चे आकडे हेच सगळे पुस्तकात दिसत असे, त्यामुळे पेपरात लाडू मिळणे हे नेहमीचेच. हा लाडू नावडीचा, एकदम गोल गोल , आणि लाल रंगाचा . हा लाडू मिळाल्यावर धम्मकलाडू पण आपोआपच मिळत असे. म्हणून मला बुंदीचा , रव्याचा , बेसनाचा, डिंकाचा कुठलाच लाडू कधीच आवडला नाही. :))))
अंदाजे पाचवी , सहावीत गेल्यावर फराळा मधील curiosity अजून वाढू लागली , दिवाळीचा दिवस येई पर्यंत फराळ खायला मिळणार नाही असा rule असल्याने वसुबारस येई पर्यंत फक्त खमंग वासाने पोट भरावे लागे. पण आईला मदत केल्यास फराळ टेस्ट करायला मिळतो हे माझ्यातल्या नटखट Sonia ने जाणले होते. म्हणून फराळ कसा करतात हे बघायला स्वारी स्वय्पाघरात तयार असे. पेपरात लाडू गोल मिळणे किती सोप्पे आणि खरा लाडू गोल वळणे किती अवघड आहे असे वाटू लागले. चकल्या कधी खुसखुशीत तर कधी मऊ कश्या पडतात हे मोठे कोडे अजूनही उमगले नाही आहे किंवा अनारसे हसले म्हणजे काय अश्या वाक्यांचा प्रयोग कळू लागला. कळत न कळत आईचे मुलीला ट्रेनिंग देणे चालू होते. चिवड्याचे पोहे हे अनेक प्रकारचे असतात तेंव्हा कळले. पण त्यातला nylon पोहे हा प्रकार पचतो कसा ह्यावर मला research करायचा होता , तो अजूनही राहूनच गेला आहे. शंकरपाळ्यांना शंकर-पाळे का म्हणतात हे कोडे मला नेहमी पडे. आज २० वर्षांनी ते कोडे सुटले आहे . तो मूळ शब्द हिंदी, त्याला शख्खर-पारे म्हणजे साखरेच्या पोळ्यांचे काप असे म्हणतात. या शख्ख्ररपारे मधे शंकराला कोणी आणला हा मोठ्ठा प्रश्न आहे. पण त्या निमित्ताने शंकराचं नाव मुखी येते हे थोडे थोडके नव्हे. अनारस्याला वरून जो रवा लावतात तो रवा नसून त्याला खसखस म्हणतात. लाडू बनवताना खमंग वास सुटतो तो तुपात रवा किंवा बेसन भाजल्याने असा आईची शिकवणी चालू असे. त्यामुळे खरचच आईला मदत करावी असे वाटू लागले होते. मग लाडू वळायला मदत करणे , शंकरपाळे करणे, कारंजीला आकार देणे , मधूनच चिवडा taste करणे … मग हे आणून दे , ते आणून दे , डब्यात भरून ठेव अशी छोटी छोटी कामे पर्वणी वाटू लागली.
असेच एका वर्षी चकली करणे चालू होते. आई चकलीचे पीठ मळत असल्याने तिने मला आतून मोहन आणावयास सांगितले. मी आत गेले आणि मोहन शोधू लागले. (मोहन म्हणजे गरम केलेले तेल) छोटे डबे झाले , मध्यम डबे , मोठ्ठे डबे झाले मोहन काही सापडेना. असं वाटलं शेजारच्या रानडेंच्या मोहनदादाला आणून उभं करावं !! तेवढ्यात आवाज आला "आता गार झालं असेल पण सावकाश आण". मी विचार सुरु केला गार झालं असणार म्हणजे फ्रीज किव्हा माठापाशी काहीतरी असणार. मी तर confidently आले आहे मोहन आणायला , मग विचारायचे कसे - मोहन म्हणजे काय ?… माझ्यापुढे मोठ्ठा प्रश्न पडला होता … पण तरी स्वारी विचारायला तयार नव्हती … केवढा मोठ्ठा ego होता ह्या चिमुरड्या जीवामध्ये … तो इगो की independent आणि knowledgeable असल्याची जाणीव होती !! हार पत्करणे रक्तातच नाही.
मी फ्रीज मध्ये शोध शोध शोधले , पण मोहन काही सापडेना , काय सापडायचे आहे हेच माहीत नसल्याने झालेली मोठी पंचाईत झाली होती. शेवटचा प्रयत्न म्हणून माठाजवळ शोधणे सुरु केले. मागे पुढे आत बाहेर सगळीकडे पहिले. आता मी तिपाहीच्या खाली बघावे म्हणून माठ उचलला. पाण्याने भरलेला माठ , मला पेलवणार तो कसा!! माझा हात सटकला, माठ फुटला आणि पाणी सांडले , त्यात माझापाय सटकला आणि मी त्या पाण्यात पडले !!…. काही फुटल्याचा आणि धप्पकन पडल्याचा आवाज ऐकून आई ,बाबा , लहान भाऊ , मदतीला आलेल्या शेजारच्या काकू सगळे स्वयापाघरात जमा झाले माझी अवस्था केविलवाण्या कुत्र्याच्या पिल्लासारखी झाली …. अचानक माझं मलाच हसू आलं आणि मी आईला म्हटलं …
पाणीच पाणी चहु कडे गं बाई… गेला मोहन कुणीकडे ?????????? :))))