Friday, February 28, 2014

हसऱ्या चष्म्यातून ...1

चंद्रशेखर गोखल्यांच्या ('मी माझा' फेम) जमान्यात बरेच कवी चारोळ्या लिहू लागले , मी ही थोडा प्रयत्न केला ,पण माफकच …


जसे …।

कधी कधी वाटतं
सांज वातीकडे एकटक पाहत राहावं
कोणी आपल्याकडे बघू नये
पण आपला जग मात्र एकट नसावं ...

-----------------------------------------------------------------------
लिहायला घेतलं  तर
मनात शंका येत जातात
पेन धीर देतं आणि
कागदावर अक्षरं उमटत जातात
-----------------------------------------------------------------------

काही  चारोळ्या लिहिल्यानंतर कळलं चारोळ्या लिहिणं म्हणजे श्रीखंडातील चारोळ्या शोधण्यापेक्षाही कठीण काम आहे :)))))))))) त्यामुळे श्रीखंड फक्त  खावे  ते  बनवण्याच्या  फंदात  पडू  नये . त्यातूनही  चारोळ्या  घातलेल्या  श्रीखंडाच्या  तर  अगदीच  नाही .

No comments:

Post a Comment